Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

पडिले वळण इंद्रिया सकळा | ©️

पडिले वळण इंद्रिया सकळा | ©️

श्री समर्थ मालिक – पडिले वळण इंद्रिया सकळा | भाव तो निराळा नाही दूजा | इंद्रियाना वळण कसे आणि कोणत्या रितीचे असावे आणि कोणत्या रितीचे नाही हा प्रश्न आहे.

जी ज्योत भक्तीत, सद्गुरु चरणात लिन झाली असेल, त्यांच्या इंद्रियांचे वळण कसे असते म्हणून त्यांनी सांगितले आहे?

“पडिले वळण इंद्रिया सकळा” त्याला जिकडे पहावे तिकडे सतच सत् विखुरलेले दिसत होते. त्यांची इंद्रिये सद्गुरुमय झालेली होती. त्यांचा भाव निराळा नाही. त्या संताने असे म्हटले, त्याप्रमाणे खरे होते की नाही? त्याचे रोम रोम सतमय झाले होते.

या पृथ्वीतलावर प्रकृती किती आहेत? तर व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. पण प्रकृती अभिन्न होईल तर एकच वळण लागेल. तुकोबाच्या म्हणण्याप्रमाणे मग सोपे आहे की नाही?

प्रकृतीच्या वळणाप्रमाणे हरएक मानव जातो. प्रत्येकाचे वळण निरनिराळे असते. कोणी असत मार्गी जातो, त्याच्या इंद्रियाना असत वळण लागते. जशी ज्याची मनोभावना, तशी गती मिळते. जो खरोखर यात रममाण झाला, त्याच्यात आणि असत भक्तीच्या मानवात, जमीन अस्मानाचा फरक असतो.

सत् भक्तीने जाणारा भक्त माझ्या प्रत येतो आणि असत भक्तीने जाणारा माझ्या प्रत येत नाही. खरे की नाही? म्हणून असत भक्तीने जाणारा कदापिही माझ्याजवळ येणार नाही. (पुढे सुरु….२) ©️

You cannot copy content of this page