Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

अखंड तत्व -३-©️

अखंड तत्व -३-©️

अघोर मनाच्या आधीन बनल्यानंतर, तो मनाच्या आधीन होतो, मग त्याच्याकडून त्याच्याच मनाप्रमाणे कर्तव्य करून घेतो. असे करताना तोच खड्ड्यात पडतो. त्यातून वर निघण्यास त्याला पुष्कळ यातायाती पडतात.

आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती असत मातले आहे? सत् भक्तीचे वळण नाही. मात्र काही मानव चमत्काराला भाळणाऱे आहेत, त्यातच त्यांचे मन निमग्न झाले आहे. क्वचितच सताच्या मागे जाणारे आहेत. त्यातही त्यांना आठवण राहत नाही. ते ही चुकतात. म्हणून कर्तव्याची दिशा कोणती आणि कशी? हे एकाएकी सांगता येणार नाही. जशी दिशा आखली जाते, तशी घडण करून कर्तव्य करून घ्यावी लागते.

मायेच्या आधीन बनलेला अघोर मानव कर्तव्य काय करणार? जडत्व संपत्तीचे ओझे घेऊन का तो जाणार आहे? म्हणून सेवेकऱ्याने ध्यानधारणा आणि भक्तीचे जे मूळ दिलेले आहे त्याचा उजाळा करणे. भक्ती ही संशय रहित, कल्पना रहित, निष्काम अशी आहे. जो निष्काम तऱ्हेने जातो त्याला ती दूर नाही. दूर जरी असली तरी सर्वांठायी मी कसा आहे हे तो पाहू शकतो. त्याप्रमाणे सेवेकऱ्याने वाटचाल करणे कर्तव्य आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page