एखादा महान भक्त किंवा सेवेकरी अह:र्निश सद्गुरु ध्यानात नामात तल्लीन असतात, रात्रंदिवस कष्ट केलेले असतात. थोडक्यात, शेवट शेवट मुक्ती मोक्ष मिळण्याचा संभव असतो. अशी वेळ जवळ आली असताना, त्याला कशी आशा सुटते? तो कोणत्या रस्त्याने जातो? तर त्याला मायेची आशा लागते. थोडासा सताचा विसर पडल्यानंतर हे माझे, ही माझी जमीन, माझा पैसा सर्व माझे माझे म्हणतो. मग मुक्ती आणि मोक्ष सानिध्यात येईल का? असा सेवेकरी असल्यानंतर, त्याने माझे माझे म्हटल्यानंतर त्याला सताच्या नामाचा विसर पडतो. मायेच्या आधीन झाल्यानंतर तो बध्द होतो, म्हणजे सतापासून दूर जातो. मायेच्या कक्षेत पूर्ण सापडल्यानंतर तो बद्ध झाला. सत सानिध्यात असताना त्याचा आवाज खणखणीत असतो. मायेच्या कक्षेत गेल्यानंतर बद्ध होतो. म्हणजे प्रकाश, श्रवणी बंद होते. मग त्याला काहीच करता येत नाही. त्याला कोणाचे ध्यान करतो याचे भान राहत नाही. बद्ध झाला नसता, तर सर्वस्व चालू राहिले असते. बद्ध झाल्यानंतर प्रकाश, श्रवणी यांची कसलीच गती नाही. कारण माझे माझे म्हणणे ! ©️
श्री राम नवमी – माझा आजचा जो अवतार दिन आहे यालाच शुभदिन म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये सत कर्तव्यसाठी जन्म अवतार …