Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

धन…..(५) ©️

हे धन कधीही उच्च पातळीला भिडविणारे नाही. म्हणून धनलोभी होऊ नका. धन पाहिजे, पण फक्त व्यवहारासाठी. धनासाठी सेवेकरी लांड्यालबाड्या करतात, पण ते योग्य नव्हे.

धनाचा योग्य तऱ्हेने वापर केल्यास, समर्थ कमी पडू देणार नाहीत. समर्थ सांगतात, ते दूरवर विचार करून सांगतात. अशा तऱ्हेने जो वागेल, त्याला समर्थ काहीही कमी पडू देणार नाहीत.

जडाला, स्थुलाला किंमत आहे. नसती तर बुद्धीचे तेज प्रगट झाले असते कां? तेव्हा हीन गतीने जाता कामा नये, जाण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला काही कमी पडणार नाही. पण त्या तऱ्हेने वागा.

सेवेकरी समर्थांना बनवायला लागला तर तो स्वत: बनला जातो. या अथांग महासागराची एक बिंदू बरोबरी करू शकतो कां? अशी स्थिती असताना, समर्थांना शेंडी लावायला जाल तर कसे होणार?

भक्तिमध्ये निर्लज्ज झाल्याशिवाय सद्गुरूंचा अंत सापडणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी कसली लाज? बिंदू जर सागराची बरोबरी करू लागला, तर तो टिकाव धरील कां? असे अनंत बिंदू त्यांनी फेकले आहेत. त्या अनंत बिंदूतला आपण एक कण आहोत. तो कण त्यांच्या चरणांजवळ जावा ही इच्छा आहे. पण मनुष्याचे जीवनच विचित्र झाले आहे. म्हणून सेवेकऱ्याने लाघवी त-र्हेने धनलोभी होऊ नये. (समाप्त)©️

You cannot copy content of this page