Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

भक्ती कोणत्या तऱ्हेने करावी? ©️

भक्ती कोणत्या तऱ्हेने करावी? ©️

अलखसेवेकऱ्यानीं कोणत्या तऱ्हेने भक्ती म्हणजे नामस्मरण करावे? सेवेकरी नामस्मरणात बसले असताना, जर ध्यान दूसरीकडे गेले, तर सत् पदाचे दर्शन कसे मिळेल? भक्ती सहज, साधी, सोपी आहे. ती कोणाला? अहंपणा व गर्व ज्याच्या ठिकाणीं नाही त्यांना ! त्यांना दर्शन सहज मिळते.

तो अहंपणा गर्व नाहीसा करण्याकरीता काय करावे? माया सर्वांना आहे. माया रहित कोणी नाही. आसनाधिस्तही माया रहित नाहीत. मायेचे दास बनू नका. आपण जर मायेचे दास बनलात तर ती हवे तसे लाघव करून पूर्णत्वाने कब्जा घेईल.

सेवेकऱ्याला मायावी भ्रमणातून मालिक वर काढतात. मात्र सेवेकरी मायावी जाळ्यात जास्तच गुरफटत जातात. नामस्मरणात बसताना सर्व विचार बाजूला ठेवा. माया त्याठिकाणी येणार नाही. जरी आली, तरी तिला विचारण्याचा सेवेकऱ्याला अधिकार आहे. पण केव्हा? सेवेकरी त्या पदाने गेला तर? असत मार्गी गेल्यास, ती लाघव केल्याशिवाय सोडणार नाही. सत मार्गी जाऊन जर, तिने लाघव केले, तर ते सेवेकरी हक्काने तिला विचारु शकतात. मग ती निरूत्तर होते. म्हणूनच सेवेकऱ्याची वागण्याची कृती, आचार, विचार – जो शब्द बाहेर टाकतो, तो विचार करूनच टाकावा. तो शब्द मालिक उचलून धरतात. जी जी कृती सेवेकरी करतो, जो बोल बाहेर फेकतो, त्या सर्वांची नोंद होत असते. सेवेकऱ्यानो लाघव करण्यास वाव देऊ नका. सेवेकऱ्याने सत पदाने चालावे असे मालिक नेहमी म्हणतात. आपला सेवेकरी बाहेर गेल्यानंतर त्याला सदगुरू पदानेच मान मिळाला पाहिजे. तो मिळण्याकरीता मी पणा, गर्व, अहंकार यांचा नाश करा. त्यांचा नाश झाल्यानंतर सर्व काही बरोबर होईल. आपण जी भक्ती करतो, ती फार कठीण आहे. कोणाला? – ज्याला वळण नाही, त्यालाच ती कठीण आहे. ©️

You cannot copy content of this page