Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

आत्मबोध – मालकांचे प्रवचन ©️

आत्मबोध – मालकांचे प्रवचन ©️

आत्मा म्हणजे काय? तर, आत असणारी ज्योत, चैतन्य । जडत्वाच्या आत असणारे, चत्वार खाणीत असणारे, सर्व ठिकाणी आकाराच्या आत असणारे, स्वयमेव तत्व तोच आत्मा । त्याच्या प्रकाशाने वाटचाल करणे याचा बोध कोणी घेतला आहे कां?

अकार व उकार या दोन्हींचा संवाद चालतो. तो बोध कोणी घेतला आहे का? जडत्वात स्वयमेव तत्व जर नसेल, तर ते जडत्व काहीही करू शकणार नाही. तरी देखिल मानव म्हणतो, “मी करतो” । कोणी म्हणतो, मला हा व्याप आहे. याचा अर्थ काय? कृती घडवून घ्यावयाची, ती चुकणार आहे का? कर्तव्य कुणाला सुटले आहे? मग मी करतो, हे सिद्ध होते का?

मग सेवेकरी म्हणा, मानव म्हणा पाठीपुढे का होतो? म्हणजेच, याला म्हणायचे माया । माया ही चंचल जरी असली तरी चंचलपणामध्ये सेवेकरी आतबाहेर, पाठीपुढे करीत असतो. मायेच्या आधीन बनणे चुकीचे आहे. मग त्याने आत्मबोध चाखायला नको का? जो मायेला कलाटणी देतो, मागे हटवतो, तोच आत्मबोधाची प्रचिती घेऊ शकतो. मग सांगा, कोणी कोणी आत्मबोधाची प्रचिती घेतली आहे? घेतली आहे म्हणावे तर पाठीपुढें का होता? जरी पाठीपुढे झालात, तरी जे भोगत्व आहे ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. आता जरी कलाटणी दिली, तरी पुढे ते भोगलेच पाहिजे. यातून मोकळा झाल्यावर कर्मसंचितातून शुद्ध स्फटिकाप्रमाणे मोकळा होईल. पुढे सत् तत्त्वाने, सत् मार्गाने जाऊ शकतो.

पण सेवेकरी मोकळा होईल का? सताचे सानिध्य आहे, तोपर्यंत तरी मोकळा होईल अशी अपेक्षा करावी का? तो सत् ठेवित जाईल का? सेवेकरी स्फटिकासारखा मोकळा होईलच, त्याची हमी कोणी घेऊ शकेल का? मग त्याला मार्ग कोणता आहे? आता तरी मी सत् संचिताचाच वाटेकरी होईन असे कोण्या सेवेकर्‍याच्या मनात उद्भवले का? सत् मार्गाने जाईल का? या सत् मार्गाने सत् सानिध्यात वाटचाल करील असे मानावे का मी? का त्यातूनही असत संचित वाढविल?…..(पुढे सुरु २)©️

You cannot copy content of this page